Skip to main content

Featured

When Letting Go Becomes Your Greatest Power

There  comes a moment in life when you realize you can’t keep carrying what’s been draining you. The habits. The people. The self-doubt. The fear of disappointing others. The version of yourself that kept shrinking just to make everyone else comfortable. And suddenly, something shifts. You wake up one day and feel exhausted  not physically, but emotionally. Tired of repeating the same cycles. Tired of waiting for permission to become who you were always meant to be. Tired of carrying dead weight that no longer belongs in your life. The truth is, growth demands space. And sometimes the only way to move forward is to let go. The Weight You Don’t Notice Anymore The scary thing about emotional weight is that you get used to it. You normalize being drained. You normalize settling. You normalize surviving instead of living. Maybe it’s toxic relationships that constantly pull you backwards. Maybe it’s your own limiting beliefs whispering, “You’re not ready yet.” Maybe it’s fear disgu...

Man

 मन एवढासा लहान शब्द पण किती सगळ समावले असते यात सागराची  अथांगता आभाळाची ऊँची सगळे  काही ....... आपली सगळी गुपित त्याच्या जवळ असतात … आपल्याला काय आवडत  काय  नाही  आपल्या सुखाच्या   दुःखाच्या  क्षणांचा खरा  साथीदार म्हणजे आपला मन असत ....... कुणी अापणास रागावले कुणी आपणास आवडल सगळा काही  सगळ्यात अगोदर मनालाच  माहित असते .......आपली स्वप्न पण तर मनातच असतात मग प्रत्यक्षात आणण्यासाठीची  आपली धडपड … जर  या जगात  कुणी आपला खरा मित्र  असेल तर आपल मन असत  खरा आहे का हे??
नाही म्हणतात मन खुप चंचल आहे क्षणात एकडे तर क्षणात तिकडे वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने धावत असते नेहमी आणि मग त्याच्या बरोबर आपल्यालाही घेऊन  जाते आपण  शरिराने तर एका ठिकाणी असतो पण मन कुठेतरी भटकत असत सारख धावतच असत कधि कधी प्रश्न पडतो थकत कस नाही ते ?
आपण कुणावर प्रेम करावे हे सुद्धा त्यानेच ठरवाव मग आपले विचार विसंगत असले तरी दिल और दिमाग मधे लढाई सुरु असते आपल्या मेंदूला माहित असते ही व्यक्ति नाही आपल्यासाठी बरोबर  व्यक्तिने कितीही दुखः दिल तरी  वेड  मन त्याचाच विचार करते तो/ती  काय करत  असेल आता आणि क्षणात त्याच्याजवळ जाऊन पोहचत तो /ती आपला विचार करत आहे का याची हुरहुर पण त्याने करावी मग इकडे समोर बॉस बसला असेल तरी मह्त्वाच काम असेल तरी त्याच्याजवळ जाऊ न पोहचत आणि आपणास बेचैन करून  सोडत एंड देन वन अवर इज़  बीन डेलिटेड फ्रॉम योर लाइफ। …। कधी याच प्रेम एकतर्फी असत आपल  मन प्रेमात पडत आणि त्याचा त्रास मेंदूला होतो कारन मेंदु नेहमी सारसर विचार करात असते नेहमी अस जरुरी नसत की मनाला आवडणारी व्यक्ति मेंदूलाही योग्य वाटेल आपले विचार समजावत असतात मनाला नको विचार करू त्या व्यक्तीचा ती नाही तुज्या योग्य पण आपला वेद मन ऐकत नसतात आपले त्याने त्याचे खेल कधीच चालू केलेले असतात आपल सार विश्व तो त्याच्या अवतिभावती गुंफवून टाकतो अगदी संसार थाटलेला असतो त्याने त्याच्या बरोबर आता आपल  जग म्हणजे फक़त तोच असतो।आपल्या जीवनातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींना गौण स्थान असते तेव्हा जस  शिक्षण  आपली स्वप्न  आपल कॅररिर  सगळं बाजूला राहत आणि माहित नाही त्या  वेळी इतक strong  कस होत कि आपले विचारांच्या पलीकडे होऊन जात सगळ आणि कधी कधी कुणीतरी आपल्या भावनांशी फक्त खेळताय हे माहित सुद्धा पडत नाही आणि तसाच ते वाहत जात . दूर कुठेतरी आणि अश्या वाटेवर येउन उभा राहत कि कुठे जाव हे त्याला स्वतःला सुद्धा कळत नाही स्वतःला हरवून बसत ते त्याला सावरायलाहि वेळ मिळत नाही आणि उधवस्त होऊन जात त्याच सगळ विश्व… मग आता त्याला आपली चूक उमगलेली असते ? आणि आता ते विचारांशी सुसंगत व्हायचा प्रयंत्न'करू लागत पण एवढ का सोप्प  असत  ते नाहीच मुळी आठवणीच्या जगात ते वावरू लागत… त्याने घालवलेले ते सोनेरी क्षण कधीतरी कातरवेळी पुन्हा जिवंत करत आणि ते आठवून डोळ्यांच्या कडा कधीच पाणावलेल्या असतात…. आणि आपले विचार ते तर पुन्हा हतबल झालेले असतात  बाजूला बसून बघत असतात कि नेमक काय चाललाय…. मग खूप वेळानंतर जेव्हा मन भानावर येत ते आपली छोटीशी सोनेरी आठवणींची कुपी बंद करून हसत डोळ्यात पाणी असतानाही …।

Comments

Popular Posts