Skip to main content

Featured

मन की गाँठें

मन की गाँठें रस्सी की गाँठों जैसी नहीं होतीं कि उन्हें हाथों से पकड़कर खोल लिया जाए। वे दिखाई भी नहीं देतीं, फिर भी उनका बोझ कंधों पर रखा किसी अदृश्य पत्थर की तरह हर समय हमारे साथ चलता रहता है। ये गाँठें अचानक नहीं बनतीं। इन्हें बनने में वर्षों लग जाते हैं। कभी किसी अधूरे संवाद से, जब हम बहुत कुछ कहना चाहते थे लेकिन चुप रह गए। कभी किसी टूटे हुए विश्वास से, जब किसी अपने ने वही किया जिसकी उम्मीद हमने कभी नहीं की थी। कभी किसी बिछड़न से, जो बाहर से साधारण दिखती है लेकिन भीतर किसी पूरे संसार को उजाड़ देती है। और कभी उन भावनाओं से जिन्हें हम व्यक्त नहीं कर पाते, क्योंकि हमें डर होता है कि कहीं हमारी संवेदनशीलता हमारी कमजोरी न समझ ली जाए। समय के बारे में कहा जाता है कि वह हर घाव भर देता है। शायद यह पूरी तरह सच नहीं है। समय कई बार घावों को भरता नहीं, बस उनके ऊपर धूल जमा देता है। हम जीना सीख लेते हैं। हम मुस्कुराना सीख लेते हैं। हम लोगों से मिलते हैं, काम करते हैं, यात्राएँ करते हैं, नई कहानियाँ लिखते हैं। बाहर से सब सामान्य दिखता है। इतना सामान्य कि दुनिया को लगता है कि हम पूरी तरह ठीक हैं। ले...

Draupadi

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले ! याचा द्रौपदीला खूप त्रास झाला ! शरीराने व मनाने ती खूप खंगली होती ! वयस्कर दिसत होती ! हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या !
अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती ! एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती.
तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले ! त्याला पाहून तिला रहावलं नाही ! धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली !
ती म्हणते,सख्या असा तर मी विचारच नव्हता केला ! असं कसं झालं ? कृष्ण म्हणाले ,पांचाली नियती खूप निष्ठुर असते ! ती आपल्या मनाप्रमाणे चालते !  द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना ? तू यशस्वी झालीस ! फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले.
द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता !
द्रौपदी म्हणते, कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?
योगेश्वर म्हणतात " नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे ! " आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.द्रौपदी विचारते, कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का ?
कृष्ण म्हणतात,नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता
द्रौपदी विचारते कृष्णा,मी काय करू शकत होते कृष्ण म्हणतो, तुझ्या स्वयंवराच्या  वेळी तू त्याचा अपमान करायला नको होतास !त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते.
आणि त्यानंतर तू तुझ्या महालात त्याचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं !
कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.
आपले शब्दच आपल कर्म बनवतात ! आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा ! नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात !

Comments

  1. मी पाहिलेल्या ,वाचलेल्या महाभारत मधील असे अनेक पात्रं आहेत कदाचित त्यामुळे ही महाभारत घडलं असेल.
    धृतराष्ट्र, महामहीम भीष्म,गुरु द्रोणाचार्य , कर्ण.

    ReplyDelete
  2. Ho Mahabharatatlya pratek patrache ek auchitya hot

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts