Skip to main content

Featured

मन की गाँठें

मन की गाँठें रस्सी की गाँठों जैसी नहीं होतीं कि उन्हें हाथों से पकड़कर खोल लिया जाए। वे दिखाई भी नहीं देतीं, फिर भी उनका बोझ कंधों पर रखा किसी अदृश्य पत्थर की तरह हर समय हमारे साथ चलता रहता है। ये गाँठें अचानक नहीं बनतीं। इन्हें बनने में वर्षों लग जाते हैं। कभी किसी अधूरे संवाद से, जब हम बहुत कुछ कहना चाहते थे लेकिन चुप रह गए। कभी किसी टूटे हुए विश्वास से, जब किसी अपने ने वही किया जिसकी उम्मीद हमने कभी नहीं की थी। कभी किसी बिछड़न से, जो बाहर से साधारण दिखती है लेकिन भीतर किसी पूरे संसार को उजाड़ देती है। और कभी उन भावनाओं से जिन्हें हम व्यक्त नहीं कर पाते, क्योंकि हमें डर होता है कि कहीं हमारी संवेदनशीलता हमारी कमजोरी न समझ ली जाए। समय के बारे में कहा जाता है कि वह हर घाव भर देता है। शायद यह पूरी तरह सच नहीं है। समय कई बार घावों को भरता नहीं, बस उनके ऊपर धूल जमा देता है। हम जीना सीख लेते हैं। हम मुस्कुराना सीख लेते हैं। हम लोगों से मिलते हैं, काम करते हैं, यात्राएँ करते हैं, नई कहानियाँ लिखते हैं। बाहर से सब सामान्य दिखता है। इतना सामान्य कि दुनिया को लगता है कि हम पूरी तरह ठीक हैं। ले...

Niyati

महाभारतात मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती चे वडील हे भीष्मांचे वडील राजा शांतनू यांच्याशी आपल्या मुलीच्या विवाहास नकार देतात कारण त्यांना ही भीती असते की पुढे तिला अपत्य झाल्यावर भीष्म हा राजा शांतनूचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे सत्यवतीच्या भविष्यात होणाऱ्या संततीला  राजगादी मिळणार नाही , त्यांना कायम भीष्माच्या आश्रयाला राहावं लागेल आणि सदैव दुय्यम स्थान मिळेल . हे सर्व पाहून देवरथ म्हणजेच गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा घेतो की तो आजन्म ब्राह्मचारी राहीन . परंतु हा एवढा सगळा भविष्याचा विचार करून सुद्धा सत्यवतीला शांतनू पासून जे पुत्र झाले , चित्रांगद आणि विचित्रवीर यांना राजाच्या पदावर बसवता आलंच नाही , एक लढाईत मारला गेला तर दुसरा आजारपणात गेला . त्यानंतर तिने भीष्माला खुप आग्रह केला परंतु त्याची प्रतिज्ञा ठाम होती ,शेवटी सत्यवतीला आपल्या प्रथम प्रियकर ऋषी पराशर यांच्यापासून झालेला पुत्र व्यास यांना बोलवून घ्यावं लागलं , त्यांच्या तेजाने आंबिका आणि अंबालिकेला अंध धृतराष्ट्र आणि पंडु ही मुले झाली , त्यांच्या मध्येही कांयम राजगादीवरून  विवाद होतेच त्याही पुढे बघता शेवटी पंडु पुत्र पांडव यांनी हस्तिनापुरावर राज्य केले परंतु ही पाच मुले देखील कुंतीने पाच देवांकडुन मंत्रांनी प्राप्त केली. हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की जी राजगादी स्वतःला मिळू नये आणि सत्यवतीच्या मुलांना मिळावी म्हणून भीष्मांला प्रतिज्ञा घ्यावी लागली,ज्यासाठी सत्यवतीच्या विवाहाला संमती मिळत नव्हती शेवटी तो मूळ हेतू तर साध्य झालाच नाही .नियतीने आपलं चक्र असं फिरवलं की सत्यवती आणि शांतनूची संतान वारस बनलीच नाही .जर हे सगळं घडलंच नसतं तर , नियमाप्रमाणे मोठ्या मुलगा म्हणजेच भीष्म राजा झाला असता तर , महाभारत घडलंच नसतं ना ? पण म्हणतात ना "नियती" पुढे कुणाचही काहीच चालत नाही , हेच खरं!

Comments

Popular Posts